
कुडाळ – कुडाळ-मालवण मार्गावर शहरातील नाबरवाडी येथे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह पादचार्यांनाही त्याचा त्रास होत आहे. याच्या विरोधात शहर भाजपच्या पदाधिकार्यांनी १७ सप्टेंबर या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयात जाऊन अधिकार्यांना खडसावले. या वेळी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता बिराडे यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर १८ सप्टेंबरपासून खड्डे बुजवण्यास प्रारंभ करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, राजू बक्षी, नीलेश परब, दीपक सावंत आदी उपस्थित होते.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !