पीडित मुलीच्या आईचे पोलिसांना निवेदन !

नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण

  • असे निवेदन का द्यावे लागते ? पोलिसांना सर्व माहिती देऊनही प्रकरणाचे अन्वेषण का होत नाही, हे वरिष्ठ पोलिसांनी पहावे, ही अपेक्षा ! – संपादक
  • लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता हिंदु मुलींनी आतातरी जागृत होऊन लव्ह जिहादचे षड्यंत्र ओळखावे आणि वेळीच सावध व्हावे ! – संपादक

नगर, २९ ऑगस्ट – माझी १५ वर्षीय मुलगी १४ ऑगस्ट या दिवशी घरातून बेपत्ता झाली आहे. आम्ही याविषयी रीतसर तक्रार सोनई पोलीस ठाणे येथे १५ ऑगस्ट या दिवशी केली परंतु ५-६ दिवस झाले, तरी आम्हाला पोलीस ठाण्यामधून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. तरी आम्हाला आमची मुलगी परत मिळावी, अशा आशयाचे निवेदन पीडितेची आई अनुराधा आढाव यांनी नगर पोलीस ठाण्यात दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

१. आम्ही आमच्या गावात चौकशी केली असता आमच्या मुलीला लतीफ शेख यांचा मुलगा सुरज शेख याने फूस लावून पळवून नेल्याचे समजले.

२. आम्ही लतीफ शेख यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी गेलो असता त्यांनी आमच्या समवेत भांडण केले आणि आम्हाला धमकी दिली, ‘आम्ही पोलीस ठाणे ‘मॅनेज’ केले आहे, काय करायचे ते करा. आमचे कुणीही काहीही करू शकत नाही.’

३. लतीफ शेख आणि त्यांच्या ३ मुलांनी माझ्या मुलीवर अत्याचार केले असतील किंवा तिला विकूनही टाकले असेल. कृपया आपण तातडीने कारवाई करावी. आमची मुलगी आम्हाला परत मिळवून द्यावी.

४. ‘माझ्या मुलीला पळवून नेण्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे’, असे आम्हाला वाटते. माझ्या मुलीने घरातून जातांना ७० ते ८० सहस्र रुपये आणि ३ तोळे सोने नेले आहे. आमच्या मुलीचे काही बरेवाईट झाले, तर त्यात कुणाला उत्तरदायी धरायचे ? आम्हाला आशा आहे की, महाराष्ट्र पोलीस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमची मुलगी शोधण्यास साहाय्य करतील.