
सातारा, २८ जुलै (वार्ता.) – अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीभरपाईसाठी निधी द्यावा. जिल्ह्यातील पूरग्रस्त, भूस्खलन झालेल्या भागांतील रस्ते आणि पुलांची कामे तात्काळ होणे आवश्यक आहे. ही कामे केंद्रीय रस्ते निधीतून करावीत, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकसभा अधिवेशनासाठी देहली येथे असलेले पाटील २ दिवसांसाठी सातारा जिल्हा दौर्यावर आले. त्यांनी महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण, कराड आदी तालुक्यांतील पूरग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पहाणी दौरा केला. पुन्हा देहली येथे पोचताच त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पूरस्थितीची माहिती दिली.
पाटील यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी पुलांची उंची अल्प असल्यामुळे पावसाळ्यात अनेक गावे संपर्कहीन होतात. त्यामुळे अनेक ठिकाणी नवीन रस्ते आणि नवीन पूल यांची निर्मिती करावी लागणार आहे. जेणेकरून भविष्यात अतीवृष्टीमध्येही वाहतूक व्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !