
मायावी शक्तींचा चालला खेळ ।
देवा, जगी नसे कुणाचा मेळ ।। १ ।।
क्रूर, धर्मांध मोगलांनी हिंदूंना छळिले ।
शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापिले ।। २ ।।
इंग्रजांनी संस्कृती नष्ट करूनी देशवासियांना लुटले ।
स्वातंत्र्यविरांनी प्राणाहुती देऊनी स्वातंत्र्य मिळवले ।। ३ ।।
राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचार अन् अनीतीने जनतेस लुबाडले ।
रज-तमाच्या प्रदूषणाने भीषण आपत्काळास निमंत्रण दिले ।। ४ ।।
धर्मविरोधी अनिष्ट शक्तींनी साधक अन् भक्तगण त्रासले ।
परम पूज्यांच्या (टीप १) रूपे श्रीविष्णु अवतरले ।। ५ ।।
साधना करून घेऊनी साधकांना आनंदी केले ।
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’चे ते उद्गाते झाले ।। ६ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१२.२०२०)
| वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !