मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हेच सर्वश्रेष्ठ शिक्षण ! – विकास दवे, संचालक, मध्यप्रदेश साहित्य अकादमी

विकास दवे

‘शिक्षणाचा हेतू काय आहे ?, पुस्तकांतून मुलांना कोणते ज्ञान दिले पाहिजे ?’, याचा विचार करायला हवा. जे शिक्षण मुक्ती देते, तेच खरे शिक्षण ! ऋषिमुनींनी आंतरिक ज्ञानाला प्रकट करण्याची शिक्षणपद्धत चालू केली होती; पण त्याच्या मूळ उद्देशापासून आपण भरकटलो आहोत. सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हे सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करावी !