‘सेक्युलॅरिझम’ची भयानक उदाहरणे !

प्रतिकात्मक छायाचित्र
  • आंध्रप्रदेशचे ख्रिस्ती मुख्यमंत्री रेड्डी यांनी तिरुमला तिरुपती मंदिर विकण्याचा निर्णय घेतला आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती हा निर्णय कसा घेऊ शकते ?
  • वैष्णोदेवी मंदिरात ‘हलाल’ प्रमाणपत्राचे भोजन देणे चालू केले. त्याची प्रत्यक्षात काही आवश्यकताच नव्हती !
  • मेरठ येथे मदरशातील बलात्काराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता पू. विष्णु शंकर जैन यांनी तेथे असलेल्या उरलेल्या अनेक मुलींना यातून सोडवण्यासाठी याचिका प्रविष्ट केल्यावर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून विचारण्यात आले.. ‘तुम्ही धर्मनिरपेक्ष राज्यात असे करूच कसे शकता ?’
  • …गांधीवधाचा खटला उघडायला न्यायालयाने अनुमती दिली; मात्र काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालय अनुमती देत नाही !
  • वर्ष १९९० मध्ये ‘हिंदु कुत्र्यांनो, तुमच्या स्त्रियांना येथे ठेवून काश्मीर सोडा अन्यथा मुसलमान व्हा’, अशी भित्तीपत्रके काश्मीर खोर्‍यात लागली. ४ लाख काश्मिरींना बंदुकीच्या धाकावर विस्थापित केले गेले. त्यांतील बहुतांश हालाखीचे जीवन जगत आहेत. १ लाख काश्मिरींच्या क्रूर, नृशंस, निर्घृण हत्या त्यांच्या कुटुंबियांदेखत झाल्या. सहस्रावधी हिंदु मुली आणि स्त्रिया यांच्यावर बलात्कार होऊन त्यांच्या हत्या केल्या गेल्या. शेकडो मंदिरे उद्ध्वस्त झाली. नरसंहाराच्या संदर्भात शेकडो एफ्.आय.आर्. होऊनही पोलीस कारवाई करत नसल्याने २०१७ मध्ये सुशील पंडित यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर त्यांना विचारले गेलेे, ‘इतके दिवस तुम्ही कुठे होतात ? हे प्रसिद्धीसाठी करत आहात का ?’ आता कोण साक्षीदार मिळणार ?’ असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निरस्त केली. (संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ चर्चासत्र)