हिंदूंनी प्रसारमाध्यमांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता वस्तूस्थितीचा अभ्यास करावा ! – आभास मलदहियार, स्तंभलेखक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

आजच्या साम्यवादी पत्रकारांची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. साम्यवाद्यांनी मुसलमानांचा सर्वाधिक छळ केला आहे. साम्यवाद्यांच्या राष्ट्रविरोधी विचारसरणीमागे हिंदुविरोधी विचारसरणी लपलेली आहे; कारण भारतासाठी हिंदूच ठामपणे उभे राहून कार्य करू शकतात, हे साम्यवाद्यांना ठाऊक आहे. हिंदुत्व म्हणजे साम्यवाद्यांच्या वाटेतील एक अडथळा आहे आणि म्हणूनच त्याला विरोध होत आहे. आताची हिंदुविरोधी परिस्थिती पहाता हिंदूंनी जागृत व्हायला हवे. हिंदुविरोधी प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घालायला हवा. सेक्युलर माध्यमांनी मांडलेल्या विचारांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता सामाजिक माध्यमांमध्ये येणार्‍या बातम्यांचा अभ्यास करून आणि माहिती मिळवून सत्य परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.