पुणे – दळणवळण बंदीमुळे पी.एम्.पी. बससेवा बंद असल्याने अंदाजे २ सहस्र २०० बस जागेवर उभ्या आहेत. मात्र त्यासाठी पीएमपीला दरमहा ४० कोटी रुपये व्यय करावा लागत आहे. या बसची बॅटरी खराब होऊ नये यासाठी त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ५०० कर्मचारी नेमले नेमले आहेत. तसेच बंद बस मागे पुढेही कराव्या लागत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १२६ बस चालू असून ३०० वाहक-चालक कार्यरत आहेत. चालू असलेल्या बससाठी लागणारे इंधन, बस गाड्यांची देखभाल दुरुस्ती आणि पी.एम्.पी.मध्ये असणाऱ्या अनुमाने १० सहस्र कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील ३४ कोटी व्यय करणे क्रमप्राप्त असून शक्य त्या ठिकाणी खर्चात कपात करण्यात येत असल्याचे पी.एम्.पी.चे मुख्य अभियंता सुनील बोरसे यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > दळणवळण बंदीमुळे पी.एम्.पी. बंद असूनही दरमहा ४० कोटींचा व्यय !
दळणवळण बंदीमुळे पी.एम्.पी. बंद असूनही दरमहा ४० कोटींचा व्यय !
नूतन लेख
- कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात येणार्या भरतीचे दिनांक घोषित !
- आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !
- गोवा : रगाडा नदीत केलेल्या रेतीच्या उत्खननाचे अन्वेषण करा !
- भाविकांच्या अलोट गर्दीत आणि अपार उत्साहात झाला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव सोहळा !
- Loksabha Elections 2024 : मतांसाठी धर्माच्या आधारे भेदभाव करू नये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
- सिंधुदुर्ग : पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना ५ मास वेतन नाही