राज्यातील दळणवळण बंदी वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

मुंबई – मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी घटली असली, तरी राज्यातील अन्य भागांत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील दळणवळण बंदीमध्ये वाढ करण्याविषयीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे वक्तव्य साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.