
१. खरे गुरुस्मरण
‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे. आपण गुरूंच्या कार्याचा विचार केला, तरच देवही आपला विचार करतो.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला सर्व पृथ्वीलाच घर बनवण्याचे ध्येय दिले आहे. आता सर्व विश्व हाच आमचा संसार आहे. गुरूंच्या कृपेने आता आम्हाला वेगळे घर आणि नातेवाईक राहिले नाहीत.
३. आपले बोलणे असे असावे की, जे दुसर्याला साधनेत प्रोत्साहन देऊन गुरुसेवेत पुढे नेईल !
प्रत्येकाचा आनंद शोधून त्याच्याच भाषेत साधनेला धरून त्याच्याशी बोलायला हवे. यालाच ‘प्रकृतीशी जुळवून घेणे’, असे म्हणतात. त्यामुळे समोरच्याशी पटकन जवळीक साधता येते आणि संबंधित कार्याची फलनिष्पत्तीही वाढते. ‘दुसर्याला काय सांगायचे आहे ?’, हे मनाशी ठरवून त्याला चूक जरी सांगायची असली, तरी ती अशा पद्धतीने सांगावी की, त्याला ती कळली पाहिजे आणि पुढची सेवा करण्यास ती प्रेरणादायीही ठरली पाहिजे. आपले बोलणे असे असावे की, ते दुसर्याला साधनेत प्रोत्साहन देऊन गुरुसेवेत पुढे नेईल. यालाच ‘उत्तम बोलणे’ असे म्हणतात.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (४.५.२०२०)
पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने जात असलेला समाज !
साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !