
सातारा – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गामुळे रहित करण्यात आली आहे, याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २० एप्रिल या दिवशी घोषित केले.
शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या वार्षिक यात्रेचा कालावधी १७ ते २७ एप्रिल असा असून यात्रेचा मुख्य दिवस २३ आणि २४ एप्रिल हा आहे. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस सातारा जिल्ह्यातील तसेच सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, धाराशीव, बीड या जिल्ह्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असून जिल्ह्यातून येणार्या भाविकांना त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !