एखाद्या संघटनेवर बंदी घातली म्हणजे तिचे कार्य संपत नाहीत, हे लक्षात घेऊन अशा बंदी घातलेल्या संघटनांचा पूर्णपणे निःपात करणे आवश्यक ठरते !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौर्याच्या आधी आणि नंतर झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दौर्याला बांगलादेशातील धर्मांधांनी विरोध केला होता. या हिंसाचारामागे बंदी घातलेली संघटना जमात-ए-इस्लामी हिचा हात असल्याचे समोर आले आहे.
१. पोलीस, प्रसारमाध्यमे आणि सरकारी कार्यालये यांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जमात-ए-इस्लामीने पैसे वाटले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावरून पंतप्रधान शेख हसीना यांना घेरण्याचा यामागे उद्देश होता.
२. एका अहवालानुसार जमात-ए-इस्लामी आणि हिफाजत-ए-इस्लाम या संघटनांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या मालकीच्या ठिकाणांवर धाडी टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना अटक करण्याचेही म्हटले आहे.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !