(म्हणे) ‘चिनी कोरोना लस घेतलेल्या भारतियांनाच मिळणार चीनचा व्हिसा !’ – चीन

असे आहे, तर चीनचा व्हिसा हवा कशाला ? अशा प्रकारे चीन भारतावर दबाव आणत असेल, तर भारतियांनीही चीनचा प्रवास करणे टाळावे आणि भारत सरकारनेही त्याही पुढे जाऊन तेथील भारतीय दूतावास बंद करून चीनवर बहिष्कार घालावा !  

बीजिंग (चीन) – चीनमध्ये येणार्‍या भारतियांना व्हिसा देतांना चीनने एक अट घातली आहे. या भारतियांना चीनचा व्हिसा घेण्यासाठी चीननिर्मित कोरोनाची लस घ्यावी लागणार आहे. चिनी लस घेतली नसल्यास त्यांना व्हिसा देण्यात येणार नाही, असे चीनने म्हटले आहे.

भारतातील चिनीच्या उच्चायुक्तालयाच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आली आहे. सध्या भारतात चीनच्या लसीला मान्यता देण्यात आलेली नाही.