मुंबईत आधुनिक वैद्यांचे अपहरण करणार्‍या टोळीला अटक

इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे नोंद असूनही गुंड आणखी गुन्हे करण्यासाठी मोकाट फिरत असणे, हे कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अपयशाचे द्योतक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

मुंबई – आधुनिक वैद्याचे अपहरण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांच्या टोळीला दहिसरमधून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गुड्डू हजरत अली याच्याविरोधात ४२ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

काही गुंडांनी ६ फेब्रुवारी या दिवशी एका आधुनिक वैद्याचे वांद्रे येथील कार्टर मार्गावरून अपहरण करून त्यांच्याकडे ९ लाख रुपयांची खंडणी मागितली होती; मात्र ६ लाख ४० सहस्र रुपये घेऊन दुसर्‍या दिवशी त्यांना सोडले. या प्रकरणी या वैद्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यावर सी.सी.टी.व्ही. चित्रण आणि अन्य तांत्रिक साहाय्याने सर्वांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून ६ लाख रुपये आणि ६ भ्रमणभाष कह्यात घेतले आहेत.