
मुंबई – विद्यार्थी आणि पालक यांच्या मागणीनंतर विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनंतर येत्या १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर राज्यातील महाविद्यालये चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
याविषयी उदय सामंत म्हणाले, ‘‘महाविद्यालये विलंबाने चालू होत असल्यामुळे परीक्षेच्या निकालावर त्याचा थोड्या प्रमाणात परिणाम होईल. विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’ परीक्षा देण्याची सवलत असेल. कोरोनामुळे वर्षातील महाविद्यालयाच्या एकूण दिवसांपैकी ७५ टक्के दिवस महाविद्यालयात उपस्थित रहाण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ शिकवणीचा पर्याय उपलब्ध राहील.’’
सौजन्य : टी.व्ही. 9 मराठी
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या