पालकांनो, भ्रमणभाषच्या होणार्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी केवळ लाडापायी स्वतःच्या पाल्याच्या हाती सहस्रो रुपयांचे महागडे भ्रमणभाष द्यायचे कि नाही, ते वेळीच ठरवा !

जळगाव – भ्रमणभाषमध्ये एका संकेतस्थळावर स्वतःचा जन्मदिनांक घालून मृत्यू कधी आणि कसा होईल ?, हे पाहून येथील हर्षल कुंवर (वय १३ वर्षे) या विद्यार्थ्याने २६ जानेवारी या दिवशी दुपारी २ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.
हर्षल इयत्ता आठवीत शिकत होता. कुटुंबीय घरात नसतांना त्याने गळफास घेतला. ते घरी परतल्यावर हर्षल त्यांना स्नानगृहात आढळला. त्याला रुग्णालयात नेले; पण वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. हर्षल एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हट्टापायी त्याच्या आईने त्याला १५ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष हप्त्यावर घेऊन दिला होता. त्याचा भ्रमणभाष पोलिसांनी कह्यात घेतला आहे.
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !