पालकांनो, भ्रमणभाषच्या होणार्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी केवळ लाडापायी स्वतःच्या पाल्याच्या हाती सहस्रो रुपयांचे महागडे भ्रमणभाष द्यायचे कि नाही, ते वेळीच ठरवा !

जळगाव – भ्रमणभाषमध्ये एका संकेतस्थळावर स्वतःचा जन्मदिनांक घालून मृत्यू कधी आणि कसा होईल ?, हे पाहून येथील हर्षल कुंवर (वय १३ वर्षे) या विद्यार्थ्याने २६ जानेवारी या दिवशी दुपारी २ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.
हर्षल इयत्ता आठवीत शिकत होता. कुटुंबीय घरात नसतांना त्याने गळफास घेतला. ते घरी परतल्यावर हर्षल त्यांना स्नानगृहात आढळला. त्याला रुग्णालयात नेले; पण वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. हर्षल एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हट्टापायी त्याच्या आईने त्याला १५ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष हप्त्यावर घेऊन दिला होता. त्याचा भ्रमणभाष पोलिसांनी कह्यात घेतला आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !