
नवी देहली – ‘आधार’ योजना वैध ठरवण्याच्या विरोधात वर्ष २०१८ मध्ये प्रविष्ट केलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने २६ सप्टेंबर २०१८ या दिवशी दिलेल्या निकालावर आधार योजना वैध ठरवतांना काही तरतुदी रहित केल्या होत्या. त्यात आधार क्रमांक, बँक खाते आणि भ्रमणभाष क्रमांक आणि शाळा प्रवेशाशी जोडण्याच्या कलमांचा समावेश होता. आता ५ न्यायाधिशांच्या खंडपिठाने ४-१ अशा बहुमताने दिलेल्या निकालात फेरविचार करणार्या याचिका फेटाळल्या आहेत.
न्यायालयाने म्हटले की, ज्या फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या, त्या पुराव्यांअभावी फेटाळण्यात येत असून या निकालाचा फेरविचार करण्याची आवश्यकता नाही. मोठ्या न्यायपिठापुढे हे प्रकरण असल्याकारणाने त्यावर फेरविचार करता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालयात ५ नवे न्यायाधीश, आता एक पद रिक्त !
वेश्याव्यवसाय संपवणे हा आमचा उद्देश नाही; कायदा केवळ त्याच्या व्यापारीकरणाच्या विरोधात ! -Supreme Court
मालमत्ताकर वसुलीच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता !
CBSE Three Language Rule : सी.बी.एस्.ई.च्या त्रिभाषा नियमाच्या अंमलबजावणीची चौकशी होईल ! – सर्वोच्च न्यायालय
Temple Gold Theft : केरळम्च्या प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने गायब !