योजना ठरवतांना त्याचा सर्व बाजूने विचार करून ती अमलात आणणे हा योग्य मार्ग आहे. आताची योजना ठरवतांना व्यय झालेला वेळ आणि पैसा याला उत्तरदायी कोण ?

पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण अल्प करण्यासाठी, तसेच बेशिस्त वाहतुकीला आळा बसावा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून प्रति ४ किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची योजना आखली होती; मात्र ही योजना अव्यवहार्य असल्याचे कारण देत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ही योजना गुंडाळण्यात आली आहे.
वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही छायाचित्रकांचा वापर करण्यात येत आहे; मात्र अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामुग्री यांमुळे कारवाईला मर्यादा येत आहेत. याविषयी महामंडळाचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता आ.पं. नागरगोजे यांनी सांगितले की, ही योजना अव्यवहार्य वाटल्याने मंत्रालय स्तरावरच स्थगित केली आहे.
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !