
कोल्हापूर – पालकमंत्री सतेज पाटील यांनी आधी स्वतःचे काम सुधारावे. मागील विसरून कामाला लागावे; अन्यथा राजकीय चक्र चालूच आहे. त्यांना खाली यायला वेळ लागणार नाही. शिवसेनेवर अन्याय होत असतांनासुद्धा मी अद्यापही काही बोललो नाही. माझ्यावरील आरोप मी सहन करत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी वर्ष २०१४ ची वेळ येऊ देऊ नये, अशी चेतावणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला दगा देण्याचे काम पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. ज्या वेळी शिवसेनेची आवश्यकता वाटते, त्या वेळी त्यांनी नेहमीच शिवसेनेकडून काहीतरी घेतले आहे. हे त्यांनी विसरू नये.’’
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक