
कोल्हापूर – पालकमंत्री सतेज पाटील यांनी आधी स्वतःचे काम सुधारावे. मागील विसरून कामाला लागावे; अन्यथा राजकीय चक्र चालूच आहे. त्यांना खाली यायला वेळ लागणार नाही. शिवसेनेवर अन्याय होत असतांनासुद्धा मी अद्यापही काही बोललो नाही. माझ्यावरील आरोप मी सहन करत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी वर्ष २०१४ ची वेळ येऊ देऊ नये, अशी चेतावणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला दगा देण्याचे काम पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. ज्या वेळी शिवसेनेची आवश्यकता वाटते, त्या वेळी त्यांनी नेहमीच शिवसेनेकडून काहीतरी घेतले आहे. हे त्यांनी विसरू नये.’’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !