
कोल्हापूर – रिझर्व्ह बँकेने ‘सुभद्रा लोकल एरिया’ या बँकेचा परवाना रहित केला असला, तरी सुभद्राची १६ कोटी ८ लाख रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडे सुरक्षित असून बँकेकडे असलेल्या ७ कोटी ९४ लाख रुपयांच्या ठेवीही सुरक्षित आहेत. ठेवीदारांच्या ठेवीही त्यांना परत मिळणार असून त्यासाठी त्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे. या कारवाईमुळे बँकेत काम करणार्या १२७ कर्मचार्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात एकूण ४ लोकल एरिया बँक कार्यरत होत्या. यातील कॅपिटल, तमिळनाडू आणि पंजाब येथील तीन बँकांचे परवाने यापूर्वीच रहित करण्यात आले असून सुभद्रा ही गेल्या ५ वर्षांपासून एकमेव लोकल एरिया बँक कार्यरत होती. सुभद्राच्या महाराष्ट्रात ११ आणि कर्नाटकात १ अशा १२ शाखा कार्यरत होत्या. सुभद्रावरील कारवाईमुळे देशात आता एकही कॅपिटल बँक शिल्लक राहिलेली नाही.
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
New FCRA Rules : ‘धार्मिक कृती’च्या नावाखाली धर्मांतर करणार्यांच्या परदेशी देणग्यांवर केंद्र सरकारचा प्रहार
अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
कोल्हापूर आणि पुणे येथे २ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा !