
कोल्हापूर – रिझर्व्ह बँकेने ‘सुभद्रा लोकल एरिया’ या बँकेचा परवाना रहित केला असला, तरी सुभद्राची १६ कोटी ८ लाख रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडे सुरक्षित असून बँकेकडे असलेल्या ७ कोटी ९४ लाख रुपयांच्या ठेवीही सुरक्षित आहेत. ठेवीदारांच्या ठेवीही त्यांना परत मिळणार असून त्यासाठी त्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे. या कारवाईमुळे बँकेत काम करणार्या १२७ कर्मचार्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात एकूण ४ लोकल एरिया बँक कार्यरत होत्या. यातील कॅपिटल, तमिळनाडू आणि पंजाब येथील तीन बँकांचे परवाने यापूर्वीच रहित करण्यात आले असून सुभद्रा ही गेल्या ५ वर्षांपासून एकमेव लोकल एरिया बँक कार्यरत होती. सुभद्राच्या महाराष्ट्रात ११ आणि कर्नाटकात १ अशा १२ शाखा कार्यरत होत्या. सुभद्रावरील कारवाईमुळे देशात आता एकही कॅपिटल बँक शिल्लक राहिलेली नाही.
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !