
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (जिल्हा बँकेचा) कारभार पहाता बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. ‘ऑडिट पॉईंट’ असतांना चुकीच्या पद्धतीने नोकरभरती चालू आहे. खोट्या हजेरी पुस्तकावर (मस्टरवर) खोट्या स्वाक्षर्या घेतल्या जात आहेत. हा गुन्हा असून सरकारने यामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘मुळातच जिल्हा बँकेत कर्मचारी अधिक आहेत. नव्याने कर्मचार्यांची भरती करू नये, असा ‘ऑडिट पॉईंट’ आलेला असतांना बँकेवरील सत्ताधारी गैरकारभार करत आहेत. बँक संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाल संपलेला असून अधिकार नसतांना लोकांना नोकरीचे आमीष दाखवून खोट्या स्वाक्षर्या घेतल्या जात असून याद्वारे फसवणूक केली जात आहे.’’
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक