
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (जिल्हा बँकेचा) कारभार पहाता बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. ‘ऑडिट पॉईंट’ असतांना चुकीच्या पद्धतीने नोकरभरती चालू आहे. खोट्या हजेरी पुस्तकावर (मस्टरवर) खोट्या स्वाक्षर्या घेतल्या जात आहेत. हा गुन्हा असून सरकारने यामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘मुळातच जिल्हा बँकेत कर्मचारी अधिक आहेत. नव्याने कर्मचार्यांची भरती करू नये, असा ‘ऑडिट पॉईंट’ आलेला असतांना बँकेवरील सत्ताधारी गैरकारभार करत आहेत. बँक संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाल संपलेला असून अधिकार नसतांना लोकांना नोकरीचे आमीष दाखवून खोट्या स्वाक्षर्या घेतल्या जात असून याद्वारे फसवणूक केली जात आहे.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !