
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ४ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले होते. सुरक्षादलाच्या शोधमोहिमेत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक भुयार सापडले आहे. पाकिस्तानातून भूमीखालून येणारे हे भुयार २०० मीटर लांब आणि ८ मीटर खोल आहे. याच भुयारातून हे चारही आतंकवादी भारतात घुसले होते.
पाकिस्तान से भारत में टेरर को एक्सपोर्ट करने वाली सुरंग का बहुत बड़ा खुलासा हुआ है#Pakistan #Terrorism #Videohttps://t.co/pmQ51s0gwR
— AajTak (@aajtak) November 23, 2020
इंजिनीयरींगचे तंत्र वापरून हे भुयार बनवण्यात आले होते. ‘यामध्ये तेथील सरकारी यंत्रणेचा हात स्पष्टपणे दिसतो’, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. आंतरराष्ट्रीय सीमेपासून हे भुयार १६० मीटर लांब, तर पाकच्या बाजूला हे भुयार ४० मीटर लांब असेल, असा अंदाज आहे. भुयार पार केल्यानंतर आतंकवादी १२ किलोमीटर आतपर्यंत घुसले होते. (याचा अर्थ भारतीय सुरक्षायंत्रणा सतर्क नाहीत, हेच स्पष्ट होते ! – संपादक) मरण्याआधी या आतंकवाद्यांनी जी.पी.एस्. उपकरणातील डाटा (माहिती) नष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षायंत्रणांनी तो डाटा पुन्हा मिळवला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati