
मुंबई – मुंबईसह उपनगरांमध्ये १२ ऑक्टोबर या दिवशी वीजपुरवठा तांत्रिक कारणामुळेच खंडित झाला होता, असा अहवाल आयआयटी मुंबईचे विद्युत अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी.जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
मुंबईतील वीज पुरवठा खंडित प्रकरणी तीन समित्या स्थापन झाल्या असून त्यातील एका समितीच्या सादर झालेल्या अहवालात म्हटले आहे की, व्यवस्थेकडून त्वरित कार्यवाही व्हायला विलंब झाला असल्यामुळे एकाच वेळी संपूर्ण मुंबई आणि उपनगरांतील वीज गेली होती. मुंबईला पुरवण्यात येणारी अतिरिक्त वीज आयलँडिंग सुविधा नीट ठेवणे आवश्यक होते; मात्र ती नीट नव्हती. अशी परिस्थिती उद्भवणे अनपेक्षित होते. त्यामुळे अशा परिस्थितीत जी जलद प्रक्रिया व्हायला हवी होती, ती झाली नाही.
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !