
‘सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे. या भयंकर आपत्काळात केवळ साधना असेल, तरच आपण टिकू शकतो.
पण केवळ बौद्धिक स्तरावर साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन साधना करणारे काही साधक श्रद्धेच्या अभावामुळे विकल्प, मायेचे आकर्षण, आर्थिक लोभ किंवा परिस्थिती या कारणांमुळे साधना सोडत आहेत. त्यांना वाटते की, ‘मला साधना कळली आहे. मी बाहेर राहूनही माझी साधना करू शकतो.’ विकल्प असणार्या साधकांनी त्यांच्या मनातील शंकांचे योग्य प्रकारे निरसन करून घ्यावे. मायेचे आकर्षण, आर्थिक लोभ किंवा परिस्थिती यांमुळे साधनेत खंड पडत असल्यास त्याविषयीही मार्गदर्शन घेऊन त्यावर उपाययोजना काढावी. ‘मला साधना कळली’, असे वाटत असले, तरी अंतर्मुखता आणि पुढील टप्प्यांची साधना, हे नियमित इतरांकडूनच शिकावे लागते. त्यांनीही पुढील टप्प्याची साधना शिकण्यावर भर द्यावा.
मनात विकल्प असलेले काही जण साधनेपासून दूर जातात, तसेच ते इतरांशी नकारात्मक चर्चा करून त्यांच्यात विकल्प निर्माण करतात. याचा गंभीर परिणाम साधक आणि समष्टी कार्य यांवर होतो. यामुळे पापकर्म घडते. साधकानी अशांपासून सावध आणि सतर्क रहावे.
साधकांनो, आपत्काळाची तीव्रता आणि ‘ही साधनेची शेवटची संधी असू शकते’, हे लक्षात घेऊन श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर त्या त्या वेळी मात करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२२.५.२०२६)
ही आहे कृतघ्नपणाची परिसीमाच !
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !
ईश्वरप्राप्तीची इच्छा ही ‘स्वेच्छा कि ईश्वरेच्छा’, यासंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार कदापि करू नका !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !