‘एखादी व्यक्ती तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांपासून दूर असते. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवतो, तसेच तिला ‘नोकरी जाणे, इतरांशी तुलना करणे, आर्थिक हानी होणे, मृत्यूची भीती वाटणे’ यांमुळे तिच्या भविष्यकाळाविषयी चिंता वाटते. परिणामी तिला जीवनात असुरक्षितता वाटते. श्रीरामरक्षास्तोत्रात अशा समस्यांचे निवारण होण्यासाठी पुढील श्लोक दिला आहे.

माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वम् मे, रामचन्द्रो दयालुर्,
नान्यञ् जाने, नैव जाने न जाने ॥ ३० ॥

अर्थ : राम माझी माता, राम माझे पिता, राम माझा स्वामी, राम माझा सखा आहे. दयाळू रामचंद्र हे माझे सर्वस्व आहे. ‘रामाविना मी अन्य काहीही जाणत नाही’, असे मी त्रिवार सांगतो.
वरील श्लोक मनोभावे आणि अर्थ समजून ३ वेळा म्हटला, तरी व्यक्तीला जाणवणारा एकटेपणा आणि असुरक्षितता न्यून होण्यास साहाय्य होते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२६)
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !
तळमळीने सेवा करणारे आणि रोगाचे अचूक निदान करण्याची दैवी शक्ती लाभल्याने साधकांचा मोठा आधार असणारे रत्नागिरी येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कै. मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !