ठाणे येथे घराचा भाग कोसळला; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघे घायाळ

ठाणे, १० जुलै (वार्ता.) – येथील ब्रह्मांड भागांतील आझादनगर परिसरातील मद्रास चाळीत १० जुलैला दुपारी ३.३५ वाजता घराच्या गॅलरीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळून १२ वर्षीय जयकुमार जयस्वाल याचा मृत्यू झाला आहे, तर उर्मिला जयस्वाल (वय ३५ वर्षे) आणि विनित जयस्वाल (वय ९ वर्षे) हे घायाळ झाले आहेत. घायाळांवर टायटन रुग्णालयात उपचार चालू आहेत. दुर्घटनेनंतर अग्नीशमनदल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस यांनी बचावकार्य राबवले. सुरक्षेच्या कारणास्तव चाळीतील ३ घरे रिकामी करून परिसराला ‘धोकापट्टी’ लावण्यात आली असून पुढील कार्यवाही चालू आहे.