‘धर्मप्रसार करत असतांना ‘अनेक वर्षांपासून साधना करणार्या साधकांच्या साधनेत कोणत्यातरी मार्गाने अडचणी निर्माण होऊन त्यांची साधना खंडित होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. ही प्रक्रिया हळूहळू पण इतक्या सहजपणे होते की, ‘साधकांच्या नकळत ते साधनेपासून दूर जाऊ लागतात.’ ही स्थिती पाहिल्यावर ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या ।’ हे गीत आठवून माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि मला स्फुरलेल्या काही ओळी पुढे दिल्या आहेत.

१. पाताळातील वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अडचणी आणून त्यांना साधना करण्यापासून परावृत्त करत असणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पुढील काळात अशा अडचणी वाढणार आहेत आणि त्यावर साधकांनी साधना वाढवणे हाच उपाय आहे’, असे आधीच सांगितलेले असणे
साधना करत असतांना साधकांच्या जीवनात प्रामुख्याने ‘कुटुंबातील सदस्यांचे आजारपण उद्भवणे, आर्थिक संकट येणे, मुलांच्या ‘करिअर’कडे लक्ष द्यावे लागणे, नातवंडांना सांभाळावे लागणे, मायेचे आकर्षण वाटणे किंवा इतर काही’ अडथळे येत असतात. काही साधक व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी साधना करण्याचे सोडून देतात. यात युवा साधक आणि साधिका यांचे प्रमाण अधिक आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आपल्याला सांगतात, ‘‘साधना करणे’, हा ‘पार्टटाइम (अर्धवेळ) जॉब’ नसून ‘फुलटाइम (पुर्णवेळ) जॉब’ आहे.’’ पूर्वी पूर्णवेळ साधना करणारे काही साधक आता अर्धवेळ साधना करून नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत.
हा सर्व काळाचा महिमा आहे. पाताळातील वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अशा प्रकारचे अडथळे आणून त्यांना साधनेपासून परावृत्त करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पुढील काळात अशा अडचणी वाढणार आहेत आणि साधकांनी साधना वाढवणे हाच त्यावर उपाय आहे’, असे निक्षून सांगितले आहे.

२. एका साधकाच्या घरी गेल्यावर सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लोभस रूप दिसणे अन् ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या’ ही ओळ आठवणे
अशाच काही अडचणींमुळे साधना सोडलेल्या एका साधकाला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्याने मला त्याच्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या. तो साधक म्हणाला, ‘‘मी सेवा करत नसलो, तरीही माझ्या मनातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा जराही न्यून झाली नाही.’’ त्या क्षणी मला सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लोभस रूप दिसले. नंतर मला प्रसिद्ध गायिका कै. लता मंगेशकर यांनी पूर्वी आर्त स्वरात गायलेले ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या’ ही ओळ आठवली. या वेळी मला त्या गीताची केवळ एकच ओळ ठाऊक होती. मी त्या साधकांना ती ओळ सांगितली; मात्र त्यांना त्याचे फारसे महत्त्व वाटले नाही.
३. अमरावती सेवाकेंद्रात आल्यानंतर ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या’ हे गीत पूर्ण ऐकणे आणि त्यावर झालेले चिंतन
मी अमरावती सेवाकेंद्रात परत आल्यानंतर ते गीत पूर्ण ऐकले. मी ते गीत पूर्ण ऐकल्यावर मला ‘त्या साधकाच्या घरी असतांना सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप का दिसले ?’, याचा उलगडा झाला आणि माझे पुढीलप्रमाणे चिंतन झाले. तेव्हा माझी भावजागृती झाली.
३ अ. आपत्काळ समीप आला असल्याने साधकांनी घराकडे यावे, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला साधनामार्ग अनुसरावा !
या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या ।
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या ।। धृ ।।
वरील ओळी वाचून मला वाटले, ‘साधना सोडून गेलेल्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रीतीने ‘चिमण्या’ म्हटले आहे आणि ते त्यांना ‘घराकडे’, म्हणजेच साधनामार्गावर परत बोलावत आहेत; कारण तिन्हीसांजा जाहल्या, म्हणजे आपत्काळ समीप आला आहे.’
३ आ. युद्धजन्य स्थिती असल्याने साधकांनी आईच्या (गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणांशी रहावे !
‘दाही दिशांनी येईल आता अंधाराला पूर ।
अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर ।।
या ओळी वाचून मला वाटले, ‘आता दाही दिशांनी युद्धजन्य स्थिती होत आहे. अशा वेळी चिमण्यांनी, म्हणजेच साधकांनी आईपासून, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापासून दूर राहू नये.’
३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्राणप्रिय असलेले साधक !
‘चुकचुक करिते पाल उगाच ।
चिंता मज लागल्या ।। २ ।।
वरील ओळी वाचून ‘विश्वात निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती ही ‘पुढे काहीतरी बिकट संकट येणार आहे’, याचा स्पष्ट संकेत आहे. साधक म्हणजे गुरुमाऊलींचा श्वास आहे. त्यामुळे गुरुमाऊलीला साधकांविषयी चिंता वाटत आहे’, असे मला जाणवले.
४. लेख लिहितांना स्फुरलेल्या कवितेच्या ओळी
या साधकांनो, परत फिरा रे साधनेकडे अपुल्या ।
असे भीषण काळ हा पुढला ।।
दाही दिशांनी येईल आता युद्धाचा पूर ।
अशा वेळी तुम्ही राहू नका रे गुरुमाऊलीपासून दूर ।। १ ।।
युद्धजन्य स्थिती संकेत देते भीषण काळाची ।
चिंता वाही गुरुमाऊली तुमच्या भविष्याची ।। २ ।।
गुरुमाऊलींनी सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणी शरणागतभावाने आणि कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’
– (पू.) श्री. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७६ वर्षे), अमरावती सेवाकेंद्र (२९.३.२०२६)
‘या लेखाचे प्राथमिक संकलन करतांना मला डोळ्यांसमोर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसू लागले आणि माझी भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.’ – सौ. अनघा पाध्ये, ढवळी, गोवा. (१७.६.२०२६)
हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे हे आहे कारण
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक किती, हे बघून त्यानुसार अधिक असलेल्या कारणासाठी प्रथम उपाय द्यावेत !
साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे