‘एखादा साधक त्याला स्वतःला होणार्या शारीरिक त्रासासाठी उपाय विचारतो. त्या वेळी साधकाला होणार्या शारीरिक त्रासाचे कारण शारीरिक आणि आध्यात्मिक, असे दोन्ही असू शकते. त्यामुळे प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधतांना दोन्ही कारणांसाठी उपाय शोधावे लागतात. शोधलेल्या दोन्ही उपायांपैकी आधी शारीरिक त्रास दूर होण्यासाठी उपाय करायचे कि आधी आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी उपाय करायचे, हे ‘शारीरिक आणि आध्यात्मिक कारणांचे प्रमाण एकूण १०० टक्के प्रमाणापैकी किती टक्के आहे ?’, यावर पुढीलप्रमाणे अवलंबून असते.

१. शारीरिक कारण अधिक प्रमाणात असणे
समजा होणार्या शारीरिक त्रासाला कारणीभूत शारीरिक कारण ७० टक्के आणि आध्यात्मिक कारण ३० टक्के असेल, तर शारीरिक कारण दूर करण्यासाठी शोधून दिलेला उपाय आधी करण्यास सांगावा. त्यामुळे वेदनांचे प्रमाण उणावेल. शारीरिक उपाय करून झाल्यावर आध्यात्मिक कारण दूर करण्यासाठी दिलेला उपाय करण्यास सांगावा.
२. आध्यात्मिक कारण अधिक प्रमाणात असणे
होणार्या शारीरिक त्रासाला कारणीभूत आध्यात्मिक कारण ७० टक्के आणि शारीरिक कारण ३० टक्के असेल, तर आध्यात्मिक कारण दूर करण्यासाठी शोधून दिलेला उपाय आधी करण्यास सांगावा. त्यामुळे शारीरिक त्रासाला कारणीभूत असलेले मूळ कारण आधी दूर होईल.
३. शारीरिक आणि आध्यात्मिक कारणाचे प्रमाण साधारण एकसारखेच असणे
समजा शारीरिक त्रासाला कारणीभूत शारीरिक कारण ४५ ते ५० टक्के आणि आध्यात्मिक कारण ५५ ते ५० टक्के, म्हणजे साधारण एकसारखेच असेल, तर कोणता उपाय आधी करण्यास सांगायचा हे तारतम्याने ठरवावे. शारीरिक त्रासाचे लक्षण तीव्र स्वरूपात असेल, तर आधी शारीरिक उपाय करण्यास सांगावा आणि शारीरिक त्रासाचे लक्षण मध्यम, म्हणजे सहन होईल असे असेल, तर आधी आध्यात्मिक उपाय करण्यास सांगावा.
एखाद्याला मानसिक त्रास होत असतांनाही त्याला कारणीभूत मानसिक कारण आणि आध्यात्मिक कारण यांचे प्रमाण किती आहे, हे शोधावे. या दोन्ही कारणांसाठी वेगवेगळे उपाय प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार शोधून मिळतात. तेव्हाही वर दिल्याप्रमाणे मानसिक आणि आध्यात्मिक कारण यांच्या प्रमाणानुसार आधी कोणता उपाय करण्यास सांगायचा, हे ठरवावे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.७.२०२६)
हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे हे आहे कारण
या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे