
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘संतांना जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे’, हे कसे ओळखायचे ?
श्री. राम होनप :
१. कालमाहात्म्य
१ अ. प्रतिकूल काळाचा प्रभाव : जेव्हा ‘वाईट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे आणि काळाची प्रतिकूलता’ यांचा परिणाम संतांवर अधिक असतो, तेव्हा संतांना जगण्याचा कंटाळा येतो.
२. ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, यात स्वेच्छा असण्याची लक्षणे

२ अ. देहयातना असह्य होणे : संत आनंदावस्थेत असतात; मात्र त्यांना कधीकधी काही कारणास्तव शारीरिक त्रास किंवा यातना होत असतात. त्यामुळे अशा संतांना जीवन नकोसे वाटते. संतांना देहाची मर्यादा असते. काही संतांना ‘हे माझे देहप्रारब्ध आहे’, याची जाणीव असते; मात्र ते भोगण्याची त्यांची तयारी नसते. तेव्हा त्यांना जगण्याचा कंटाळा येतो.
२ आ. समाजाच्या कल्याणाचा विचार न्यून होणे : जेव्हा संतांना अत्युच्च आनंद मिळत असतो, तेव्हा त्यांना काहीतरी कार्य करण्याची इच्छा रहात नाही. सतत कार्य करावे लागले, तर त्या संतांना जीवनाचा कंटाळा येतो.
२ इ. कार्यात यश न मिळणे : काही संत राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात, तसेच आध्यात्मिक कार्य करत असतात. या कार्यात अपेक्षित असे यश न मिळाल्यास त्यांना जीवनाचा कंटाळा येतो.
३. ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, यात ईश्वरेच्छा असण्याची लक्षणे
३ अ. संतांना अंतर्ज्ञानाने ‘ईश्वर आणि मायेचे कार्य’ यांविषयी समजलेले असणे : संतांना अंतर्ज्ञानाने ‘ईश्वर आणि मायेचे कार्य’ यांविषयी समजलेले असते. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर जाणून घेण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे काही शेष रहात नाही. तेव्हा त्यांना जीवनाचा कंटाळा येतो.
३ आ. आनंदमय अवस्थेत वाढ होणे : संतांच्या साधनेमुळे त्यांच्या आनंदमय अवस्थेत वाढ होते. त्या स्थितीत त्यांना ‘अन्य सर्व गोष्टी माया आहे’, याचे ज्ञान होत असते. अशा संतांना मायेपासून अलिप्तता येते. त्यामुळे त्यांना या संसारी जीवनाचा कंटाळा येतो.
३ इ. अहंशून्य अवस्था प्राप्त होणे : संतांनी साधनेने अहंशून्य अवस्था प्राप्त केलेली असते. त्यांना ‘सर्वकाही ईश्वरी नियोजनाने आणि ईश्वरेच्छेने घडत आहे’, याचे ज्ञान असते. त्यामुळे त्यांना ‘आता मला करण्याजोगे काहीच नाही’, असे वाटते.
३ ई. जगण्याचा कंटाळा येणे : संतांना परेमश्वराच्या मीलनाची, म्हणजेच मोक्षाची ओढ लागलेली असते. त्याचा परिणाम म्हणून त्यांना जगण्याचा कंटाळा येतो.
३ उ. वैराग्य अवस्थेकडे वाटचाल होत असणे : संत सतत भगवंताच्या अनुसंधानात असतात. त्यामुळे ते ‘मायेतील विचार आणि कार्य’ यांपासून दूर गेलेले असतात. त्यांची ही स्थिती वाढत गेल्यावर संतांना वैराग्य अवस्था प्राप्त होते. त्याला ‘निवृत्ती परायण अवस्था’, असेही म्हणतात.
ऊ. ईश्वरी संकेत असणे : उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांना ‘कार्यपूर्ती आणि देहत्याग करणे’ यांचे संकेत ईश्वराकडून प्राप्त होत असतात. त्यामुळे त्यांना जीवनाचा कंटाळा येतो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ११.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३५ आणि कालावधी : १० सेकंद)
हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे हे आहे कारण
या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक किती, हे बघून त्यानुसार अधिक असलेल्या कारणासाठी प्रथम उपाय द्यावेत !
साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
पू. श्रीमती सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७७ वर्षे) यांनी साधकांना केलेले भावपूर्ण मार्गदर्शन !