देवतेचे चैतन्य हे जिवाच्या भावावर अवलंबून असते !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

देवता, संत आणि गुरु यांच्या छायाचित्रांतील किंवा चित्रांतील चैतन्य प्रकट होण्याचे अन् त्याच्या प्रक्षेपणाचे प्रमाण हे जिवांच्या भावावर अवलंबून असणे ! जसा भाव, तसा देव’, या उक्तीप्रमाणे देवतांमध्ये जरी १०० टक्के चैतन्य आणि शक्ति असली, तरी त्यांच्या छायाचित्रांतील किंवा चित्रांतील चैतन्य प्रकट होण्याचे अन् त्याच्या प्रक्षेपणाचे प्रमाण हे जिवांच्या भावावर अवलंबून असते. ज्या प्रमाणात समष्टीच्या भावाप्रमाणे देवतांच्या चित्रांमधून, गुरूंच्या किंवा सद्गुरूंच्या छायाचित्रांमधून चैतन्य, शक्ति किंवा आनंद प्रक्षेपित होत असतो, त्या प्रमाणात मांत्रिकांचे वर्तमान स्थितीप्रमाणे आक्रमणांचे प्रमाण पालटत असते.’

– एक विद्वान (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून)