महाबळेश्वरमधील नावली गावातील भूमी अतीवृष्टीमुळे खचली !

महाबळेश्वरमधील नावली गावातील भूमी अतीवृष्टीमुळे खचली

महाबळेश्वर (सातारा) – महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात ४ जुलैच्या सकाळी झालेल्या अतीवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूची काही भूमी (भाग) खचून झाडांसह मातीचा मोठा ढीगारा रस्त्यावर वाहून आला. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे काम चालू केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार सचिन म्हस्के यांनी केले आहे.

४ घरांपैकी एक घर आधीपासूनच बंद असून उर्वरित ३ घरांतील नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सध्या गावाला कोणताही तातडीचा धोका नाही. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.