

पंढरपूर – ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिर जतन अन् संवर्धन विकास आराखड्यां’तर्गत जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर, तसेच श्री मारुति मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ५ जुलै या दिवशी विधीवत् पार पडणार आहे. याविषयीची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांनी दिली. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांचे जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्यात आले असून मंदिरांचा ऐतिहासिक वारसा जपत त्यांचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत किती मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण झाले आहे ?
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !
एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व किंवा तिचे परदेशी नाव तिची हिंदु धर्मावरील श्रद्धा ठरवू शकत नाही ! – Madras High Court
आल्त पर्वरी येथे ७ बंगल्यांमध्ये चोरी
कुडचडे येथे ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न