Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार

‘जमात-उल-अहरार’ या आतंकवादी संघटनेने घेतले आक्रमणाचे दायित्व

कराची (पाकिस्तान) – येथे २७ जूनच्या रात्री सिंध रेंजर्सच्या मुख्यालयावर आक्रमण करण्यात आले. या वेळी झालेल्या चकमकीत ६ आतंकवादी ठार, तर एकाला जिवंत पडकण्यात आले. यामध्ये ४ सैनिकही ठार झाले. जवळपास दीड घंटे ही चकमक चालू होती. ऑक्टोबर २०२४ नंतर कराचीमधील हे पहिले मोठे आतंकवादी आक्रमण मानले जाते. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेशी संबंधित आतंकवादी संघटना ‘जमात-उल-अहरार’च्या आतंकवाद्यांनी हे आक्रमण केले. त्यांनी आधी स्फोटकांनी भरलेले वाहन मुख्य प्रवेशद्वारावर धडकवून परिसरात प्रवेश केला आणि यानंतर हँड ग्रेनेड फेकत अंधाधुंद गोळीबार चालू केल

संपादकीय भूमिका

भारतात आतंकवादी घटना घडवून आणणार्‍या पाकमध्येही आतंकवादी आक्रमण होतांना पाहून पाकच्या कर्माची फळे त्याला मिळत आहेत, असेच वाटते !