‘१७.५.२०२६ या दिवशी मी मुंबई येथील श्री राजमातंगीदेवी यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात होतो. त्या वेळी मला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात पालट झाल्याचे जाणवले.


१. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी माझे लक्ष सहज बाहेर गेले. तेव्हा आश्रमाच्या परिसरातील वातावरणात पुष्कळ चैतन्य आणि शांतता जाणवत होती. तेव्हा पुष्कळ आल्हाददायक वाटत होते. गार हवेची झुळूक आली आणि माझे मन शांत झाले. आकाशात गुलाबी आणि निळ्या रंगाच्या छटा पाहून माझ्या मनाला शांत अन् प्रसन्न वाटत होते.



२. त्यानंतर थोड्या वेळाने यज्ञस्थळी ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्र’ चालू झाले. संध्याकाळी ७.४७ वाजता अंधार असूनही आकाशातील गुलाबी आणि निळ्या रंगाच्या छटा गडद दिसत होत्या. आकाशाकडे पाहून मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘यज्ञातील चैतन्याने आश्रमाच्या भोवती अभेद्य संरक्षक कवच निर्माण झाले आहे’, असा विचार माझ्या मनात येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
श्री राजमातंगीदेवीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. अमित अशोक हावळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२६)
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !