१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी

प्रतिकात्मक इमेज

फलटण (सातारा) – २५ मेच्या पहाटे ३ वाजता येथील कुरेशीनगरमध्ये गोरक्षकांनी २० गोवंशियांचे रक्षण केले होते. फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र याला १ मास उलटून गेला, तरी गोतस्करांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मानद पशूकल्याण अधिकारी अवधूत गोरख धुमाळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

संपादकीय भूमिका

तक्रार करूनही कारवाई करत नसतील, तर असे पोलीस हवेतच कशाला ? यामध्ये वरिष्ठ पोलिसांनी लक्ष घालून गोतस्करांवर कारवाई त्वरित करणे आवश्यक !