केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान

नवी देहली – पुढील वर्षापर्यंत एक-दोन राज्ये वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा’ (अफस्पा) हटवला जाऊ शकतो, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.
आसाम-नागालँड सीमेवर तेल आणि खनिजे यांच्या उत्खननासाठी केंद्र सरकार, तसेच आसाम अन् नागालँड यांची राज्य सरकारे यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्या वेळी गृहमंत्री बोलत होते.
गृहमंत्री पुढे म्हणाले की, ईशान्य भारतात कायमस्वरूपी शांतता आणि विकास साधण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने वर्ष २०१९ पासून अनेक शांतता करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामुळे हिंसक घटनांमध्ये ८० टक्क्यांनी घट झाली असून ‘सशस्त्र दल कायद्या’च्या कक्षेत येणार्या एकूण क्षेत्रफळातही ८० टक्क्यांनी घट झाली आहे. आज संपूर्ण ईशान्य भारत ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने पुढे जात आहे. हा करार या क्षेत्राच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल.
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !
महंमद समीर याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या बर्याच गोळ्या बलपूर्वक दिल्याने तिचा मृत्यू !
Mahalakshmi Kolhapur Suvarna Kalash : श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कळस बसवला !
कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार