
माणगाव, १० जून (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील माणगाव बसस्थानकाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रशस्त बसस्थानक, आधुनिक प्रकाश दिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, जुन्या बांधकामाची डागडुजी, प्रतीक्षालयात नवीन फरशी, बसण्यासाठी मार्बलचे कठडे, नवीन दिवे, पंखे, ‘सीसीटीव्ही छायाचित्रक’ आदी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु प्रवासी करत असलेल्या अस्वच्छतेमुळे आणि येथे नियमित चांगली स्वच्छता न केल्यामुळे बसस्थानकाच्या नूतनीकरणाला गालबोट लागत आहे. (अस्वच्छता करणार्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला पाहिजे ! – संपादक)
अशी आहे बसस्थानकावर अस्वच्छता !
१. बसस्थानकावरील कचराकुंड्यात कचरा टाकण्याऐवजी बसस्थानकाच्या परिसरात सर्वत्र कचरा टाकलेला दिसतो. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, बिस्किटचे पुडे, वेफर्स यांची वेष्टने, चहाचे कागदी कप, शिल्लक खाद्यपदार्थ बसस्थानकाच्या परिसरात सर्वत्र पुष्कळ प्रमाणात पडलेले दिसतात.

२. चहाच्या दुकानाच्या बाहेरील कचर्याचा डबा पूर्णपणे भरला होता. तो रिकामा करण्यात आला नव्हता किंवा रिकाम्या पेल्यांसाठी बाजूला अन्य पिशवीही ठेवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी रिकामे पेले कचर्याच्या डब्याच्या बाहेर टाकले होते.
३. चहाच्या स्टॉलच्या बाहेरील कचर्याचा डब्याच्या बाजूची भिंत, बसस्थानकावरील फुलदाण्या यांवर पान-तंबाखू खाऊन पिचकार्या टाकण्यात आल्या होत्या. यामुळे रंगकाम केलेल्या भिंती विद्रूप झाल्या आहेत.
Ground Report | Mangaon Bus Stand (Raigad)
❌ Garbage across premises
❌Overflowing dustbins
❌Poor cleanliness despite renovation
❌Spitting stains on wallsImmediate inspection and corrective action needed.@msrtcofficial@PratapSarnaik pic.twitter.com/jwtSuQeop3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026
| बसस्थानकाच्या या स्थितीविषयी बसस्थानकाच्या अधिकार्यांना ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘प्रवासी स्वच्छता पाळत नाहीत. कचरा कुठेही फेकतात. उपलब्ध सुविधांचा सुयोग्य उपयोग करत नाहीत. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील स्थानक असल्यामुळे येथे गर्दी अधिक असते. त्या तुलनेत स्वच्छता कर्मचारी एकटाच आहे. आम्ही अधिक मनुष्यबळाची मागणी केली आहे. (आधुनिक स्थानकासमवेत ते स्वच्छ ठेवण्यासाठी तेवढेच स्वच्छता कर्मचारी का नाही नेमले ? आगार व्यवस्थापनाला हे लक्षात का आले नाही ? – संपादक) |
|

पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !