स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडे मागणी !
सत्ताधारी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’मध्ये सहभागी होण्याची इच्छा !

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधीमंडळ गटात फूट पडल्यानंतर आता संसदीय पक्षातही फूट पडल्याचे समोर आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची मागणी केली. यासह सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा मानसही व्यक्त केला. स्वाक्षरी करणार्यांमध्ये अरूप चक्रवर्ती, पार्थ भौमिक, शताब्दी रॉय, जगदीश बसुनिया, काकोली घोष दस्तीदार, प्रसून बॅनर्जी, कालीपदा सोरेन, शर्मिला सरकार, जून मालिया, बापी हलदार, असित मल आणि सुवेंदू शेखर रॉय यांचा समावेश असल्याचे समजते. बंडखोर गटाच्या नेत्या म्हणून काकोली घोष दस्तीदार यांना मान्यता देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. २० बंडखोर खासदारांमध्ये भाजपचेच माजी नेते आणि नंतर तृणमूलमध्ये प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांचाही समावेश आहे, हे विशेष.
स्वतंत्र गटाला मान्यता मिळवण्यासाठी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिण्यापूर्वी बंडखोर सदस्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन् यांची भेट घेतली, राज्यसभेतील सदस्यपदाचे त्यागपत्र दिले आणि पक्ष सोडण्याची घोषणा केली.
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
Kerala Shigella Outbreak Reported : केरळम्मध्ये ‘शिगेला’ संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू, १२६ जणांना लागण !