हिंदी पत्रकारितेचा २०० वा वर्षपूर्ती सोहळा !

मुंबई – मातृभाषा आणि भारतीय भाषा यांद्वारे ज्ञान, संस्कृती अन् मूल्ये यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोचतो. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण, भारतीय भाषांचे संवर्धन आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘मुंबई हिंदी पत्रकार संघा’च्या वतीने आयोजित हिंदी पत्रकारितेच्या २०० व्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेसह इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे.’’
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !