Blood On Streets : भाग्यनगरमध्ये बकरी ईदला झालेल्या पशूहत्येमुळे हिंदु वस्त्यांतील रस्त्यांवर वाहिले रक्ताचे पाट !

स्थानिक हिंदूंकडून संताप व्यक्त

भाग्यनगर (तेलंगाणा) – बकरी ईदनिमित्त भाग्यनगरमधील मुशिराबाद येथे पशूहत्येमुळे रस्त्यांवरून रक्ताचे पाट वहात असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. हे रक्त बांगलादेश मार्केटपासून ते आसपासच्या हिंदु वस्त्यांतील रस्त्यांपर्यंत पसरले होते. हे भीषण दृश्य पाहून स्थानिक हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात आला. भाग्यनगरमधील भाजपच्या ‘लीगल सेल’च्या (कायदा विभागाच्या) अधिवक्त्या नीलम भार्गवा राम यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ प्रसारित करून हा प्रकार उघड केला.

सामाजिक माध्यमांत लोकांनी या घटनेवरून प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘पेटा इंडिया’सारख्या संस्थांना धारेवर धरले. ‘केवळ हिंदु सणांच्या वेळी उपदेश करणार्‍या या संघटना आता ही क्रूरता आणि अस्वच्छता यांविषयी गप्प का ?’, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. यासह ‘या कृत्यामुळे स्थानिक लोकांच्या धार्मिक भावना आणि सार्वजनिक स्वच्छतेचे उल्लंघन झाले आहे. धार्मिक परंपरांच्या नावाखाली अल्पसंख्य समाजाला अशा प्रकारे त्रास देण्याची मोकळीक दिली जाऊ शकत नाही’, असे लोकांचे म्हणणे आहे.

पोलीस प्रशासनाचे मौन !

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या गंभीर प्रकरणावर पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनी मौन बाळगले असून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

संपादकीय भूमिका

  • एरव्ही हिंदु सणांच्या दिवशी त्यांच्या मिरवणुका कुणा मशिदीसमोरून गेल्या आणि साधा गुलाल मशिदीच्या परिसरात उडाला, तरी हिंदूंवर आक्रमणे होऊन त्यांच्या हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता बकरी ईदच्या वेळी असे घडत असेल, तर हिंदूंनी बांगड्या घालून घरात बसले पाहिजे, असेच धर्मनिरपेक्ष लोकशाहीतील सरकारांना वाटते, हे लक्षात घ्या !
  • अशा घटनांविषयी प्राणीप्रेमी संघटना गप्प का असतात ?