
पालघर – मोगल भारतात येण्यापूर्वी येथील मुसलमान बांधव हिंदूच होते. मोगल आल्यानंतर येथील हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे भारतातील मुसलमान हे औरंगजेबाची नाही, तर हिंदूंचीच संतान आहेत, असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २७ मे या दिवशी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसलमानांनी बकरी ईदच्या निमित्ताने सोसायटीमध्ये कबर्या कापण्यासाठी आणल्याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि भाजप यांच्याकडून विरोध होत आहे. याविषयी पत्रकारांनी भूमिका विचारल्यावर रामदास आठवले यांनी अशा प्रकारे विरोध करणे चुकीचे असल्याचे म्हटले.
‘अडीच सहस्र वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक एकत्र रहात होते. सध्या राजकीय लाभासाठी कुणीही धार्मिक भावना भडकावू नयेत. मग ते भाजपचे लोक असोत किंवा अन्य कुणी. अशा पद्धतीने कुणालाही विरोध केला जाऊ नये’, असेही ते म्हणाले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !