
पालघर – मोगल भारतात येण्यापूर्वी येथील मुसलमान बांधव हिंदूच होते. मोगल आल्यानंतर येथील हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे भारतातील मुसलमान हे औरंगजेबाची नाही, तर हिंदूंचीच संतान आहेत, असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २७ मे या दिवशी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसलमानांनी बकरी ईदच्या निमित्ताने सोसायटीमध्ये कबर्या कापण्यासाठी आणल्याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि भाजप यांच्याकडून विरोध होत आहे. याविषयी पत्रकारांनी भूमिका विचारल्यावर रामदास आठवले यांनी अशा प्रकारे विरोध करणे चुकीचे असल्याचे म्हटले.
‘अडीच सहस्र वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक एकत्र रहात होते. सध्या राजकीय लाभासाठी कुणीही धार्मिक भावना भडकावू नयेत. मग ते भाजपचे लोक असोत किंवा अन्य कुणी. अशा पद्धतीने कुणालाही विरोध केला जाऊ नये’, असेही ते म्हणाले.
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court