हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे आवाहन

मुंबई, २६ मे (वार्ता.) – गृहसंकुलांमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र तरीही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांतील गृहसंकुलांमध्ये बकरी ईदनिमित्त हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे. बकरी ईदनिमित्त अशा प्रकारे होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. याविषयी २६ मे या दिवशी त्यांनी मंत्रालयात वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत दिली.
🚨 Stop Illegal Animal Slaughter in Residential Complexes on Bakri Eid!
“Administration must take strict action against illegal slaughter activities in housing societies and residential areas!” – @Ramesh_hjs National Spokesperson, @HinduJagrutiOrg
During Hindu festivals like… pic.twitter.com/zLcO0W7EzF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 27, 2026
या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘बकरी ईदनिमित्त गृहसंकुलांमध्ये बकर्या आणून त्यांना कापले जाते. या वेळी रक्तमिश्रित पाणी आजूबाजूच्या परिसरात फेकले जाते. त्यामुळे रोगराई पसरते. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.’’
हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची आवई उठवणारे आता कुठे आहेत ?होळी, गणेशोत्सव आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तसेच पुरो(अधो)गामी मंडळी प्रदूषण होत असल्याची आवई उठवून ते रोखण्याचे आवाहन करण्यासाठी पुढे येतात. बकरी ईदनिमित्त पशूंच्या अवैध हत्या करून रक्तमिश्रित पाण्यामुळे होणार्या रोगाच्या प्रादुर्भावाविषयी ही मंडळी का पुढे येत नाहीत ? असा प्रश्न श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी उपस्थित केला. |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !
१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग