
देहू (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी सोहळ्यात यंदा नवीन चांदीचा रथ सिद्ध करण्यात येत असून त्याचे लाकडी नक्षीकाम पूर्ण झाले आहे. लाकडी रथाला चांदी लावण्याचे काम चालू करण्यात आले. साधारणत: २५० किलो चांदीचा वापर त्यासाठी करण्यात येणार आहे. पुण्यातील कोंढवा येथील सुरेश मिस्री आणि त्यांचे १० कारागीर चांदी लावण्याचे काम करत आहेत. राजस्थान येथील सुमेरपूर येथून बर्मा टिक सागवण लाकूड खरेदी करून वापरण्यात आले.
नवीन रथ निर्मितीसाठी साधारणत: १५० घनफूट लाकूड वापरण्यात आले असून त्यावर अत्यंत सुबक आणि कलात्मक कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. रथावरील नक्षीकाम दाक्षिणात्य स्थापत्यशैलीवर आधारित असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिकृतींमुळे रथ अधिक देखणा अन् भव्य बनत आहे. यंदाचा पालखी सोहळा ७ जुलैला देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून त्यापूर्वी नवीन पालखी रथाचे सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे.
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !