
जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम भूमी आणि मंदिरांच्या अन्य भूमी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा येत आहे. हिंदु देवस्थानांचे अस्तित्व संपवण्याचा हा डाव आहे. त्यामुळे शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडू, अशी चेतावणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत सरकारला दिली आहे. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, स्वामी नारायण मंदिराचे श्री नयन स्वामी महाराज, नागाई जोगाई माता मंदिराचे विश्वस्त श्री. दिनेश सोनवणे, मनुदेवी मंदिराचे विश्वस्त श्री. नीळकंठ चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे उपस्थित होते.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !
मुख्यमंत्र्यांशी बोलून वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावतो !