‘हिंदु एकता आंदोलना’ची चेतावणी

कोल्हापूर, २१ मे – हिंदु मंदिरांचे अस्तित्व आणि भाविकांच्या श्रद्धा धोक्यात आणणारा ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ रहित करा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ‘हिंदु एकता आंदोलन’ संघटनेने दिली आहे. या मागणीसाठी १९ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला ‘अखिल महाराष्ट्र गुरव समाज सुधारक मंडळ’ यांनीही त्यांचा पाठिंबा घोषित केला आहे.

या प्रसंगी ‘हिंदु एकता आंदोलना’चे सर्वश्री दीपक देसाई, विलास मोहिते, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार, तसेच अर्चना जाधव, पूजा शिंदे, अंजली जाधव यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित