वृक्षांना मिठ्या मारणारे आणि नद्यांकडे दुर्लक्ष करणारे कथित पर्यावरणप्रेमी !

काही मासांपूर्वी नाशिकमध्ये पार पडणार्‍या सिंहस्थ महाकुंभपर्वासाठी वृक्षतोड होणार; म्हणून कथित पर्यावरणप्रेमी वृक्षांना मिठ्या मारून ‘वृक्ष तोडू देणार नाही’, असा कांगावा करत प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यात काही अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी बहुसंख्येने सामील झाले होते.

अधिवक्ता अनेश परळकर

सनातन हिंदु धर्मामध्ये नदीला माता मानून तिची पूजा केली जाते. पिंपरी-चिंचवड येथील पवना या अत्यंत पवित्र अशा नदीच्या पात्राजवळील कसायी, रासायनिक कारखानदार आणि रहिवासी यांनी मांसाचे अन् हाडाचे तुकडे, रसायनमिश्रित दूषित पाणी, प्लास्टिकचे तुकडे आणि अनेक दूषित पदार्थ सर्रासपणे नदीत फेकून दिलेले आढळतात; परंतु अशा वेळी वृक्षाला मिठ्या मारणारे अभिनेते, कथित पर्यावरणप्रेमी आणि समाजसुधारक कुठेही आढळत नाहीत. बरे हा प्रकार केवळ आता चालू झालेला नसून गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास चालत आहे. यामध्ये कसायी आणि कारखानदार यांना विरोध करून पर्यावरणवाद्यांना त्याचे किती परिणाम भोगावे लागतील, याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच सर्वांत ‘सॉफ्ट टार्गेट’ (सौम्य लक्ष्य) असलेल्या हिंदु धर्माच्या श्रद्धेवर ते कथित पर्यावरणप्रेमाचा कंड क्षमवून घेतात.

– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई (१४.५.२०२६)