सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पातील सामर्थ्यामुळे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप आपोआप चालू होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘मागील २५ – २६ वर्षांमध्ये गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) साधकांना वेगवेगळे नामजप करायला सांगितले आणि साधकांकडून ते करूनही घेतले. ‘काही दिवसांपासून माझ्याकडून उपायांसाठी करत असलेला नामजपाच्या व्यतिरिक्त इतर वेळी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप दिवसभर आणि रात्री कधीही जाग आली, तरी चालू आहे’, हे माझ्या लक्षात यायचे.

२. आता गुरुदेवांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप अधिकाधिक वेळा करायचा आहे’, असे सांगितले आहे. आरंभीचे २ – ३ दिवस मी झोपेतून कधीही जागी झाले, तरी माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हाच नामजप चालू व्हायचा. त्या वेळी मला ‘आता मला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप करायचा आहे’, याची जाणीव व्हायची आणि माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप चालू व्हायचा.

३. आता मला जाग आली की, माझ्याकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप आपोआपच चालू होतो.

यातून ‘गुरुदेवांचा संकल्प झाला की, ती गोष्ट आपोआपच होत असते’, हे माझ्या लक्षात आले आणि गुरुदेवांच्या संकल्पातील सामर्थ्य मला अनुभवायला मिळाले.’

– सौ. अंजली अजय जोशी (वय ६३ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (६.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक