(म्हणे) ‘सनातनने लोकांना विभागण्याचे काम केल्याने त्याला नष्ट केले पाहिजे !’ – Udhayanidhi Stalin

जनतेने सत्ताच्युत केल्यानंतरही तमिळनाडूतील द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा सनातनविरोधी विधान

द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – ज्या सनातनने लोकांना विभागण्याचे काम केले, तो नष्ट केला पाहिजे, असे विधान तमिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि द्रमुकचे आमदार उदयनिधी स्टालिन यांनी विधानसभेत केले. राज्यात प्रथम राष्ट्रगीत ‘जन गण मन’, नंतर राष्ट्रीय गीत ‘वन्दे मारतम्’ आणि त्यानंतर तमिळाडूचे राज्यगीत लावण्यात येत असल्यावरून वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या नियमानुसार प्रथम राज्यगीत वाजवणे आवश्यक असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. त्यावर बोलतांना उदयनिधी यांनी वरील विधान केले.

संपादकीय भूमिका

  • देशातील जिहादी आतंकवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, जातीभेद नाही, तर सनातन लोकांना विभागण्याचे काम करत आहे, असे म्हणणारे उदयनिधी यांचे डोके ठिकाणावर नाही, हेच स्पष्ट होते !
  • सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हटल्यामुळे जनतेने उदयनिधी यांच्या पक्षाला सत्ताच्युत केल्यानंतरही त्यांना शहाणपण आलेले नाही. आता जनतेने त्यांच्या पक्षाचा राजकीय अंत करणे आवश्यक आहे !