हिंदूंना कोणत्याही गोष्टीसाठी क्षमा मागण्याची आवश्यकता नाही ! : RSS General Secretary Dattatreya Hosabale

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे अमेरिकेत विधान

उजवीकडे दत्तात्रेय होसबाळे

वॉशिंग्टन (अमेरिका) – हिंदूंनी कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. हिंदूंनी कधीही कुणाला गुलाम बनवले नाही. त्यामुळे हिंदूंना कोणत्याही गोष्टीसाठी क्षमा मागण्याची आवश्यकता नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे केले. येथील हडसन विश्वविद्यालयात एका चर्चेच्या वेळी ते बोलत होते.

भारतीय उपखंडाच्या संदर्भात ओळख आणि प्रादेशिक तणावाकडे संघ कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ?, या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना होसबाळे म्हणाले की, संघाच्या दृष्टीने हिंदु ही धार्मिक नव्हे, तर एक सांस्कृतिक ओळख आहे. संघाने नेहमीच सांस्कृतिक लोकधर्म आणि मूल्य यांवर भर दिला आहे, ज्यांचा कोणत्याही धर्माशी थेट संबंध नाही.