रायपूर (छत्तीसगड) येथील घटना
महफूज खान याने कविताची हत्या केल्याच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर त्याला अटक

रायपूर (छत्तीसगड) – येथील संतोषी नगर भागात १९ एप्रिलला रात्री १९ वर्षीय कविता दास हिचा मृतदेह तिचा प्रियकर महफूज खान याच्या घरी संशयास्पद परिस्थितीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तरुणीच्या कुटुंबियांनी महफूज खान याच्यावर कविताचा छळ आणि हत्या केल्याचा आरोप केला आहे. घटनेचे गांभीर्य जाणून पोलिसांनी महफूज खान याला अटक केली असून त्याची चौकशी चालू आहे.
कविताने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा तर्क कविताच्या कुटुंबियांना मान्य नाही. तिच्या कुटुंबाने ‘महफूज खान कवितावर वारंवार विवाहासाठी दबाव आणत होता, ज्यामुळे कविता प्रचंड मानसिक तणावाखाली होती. तो कविताला मारहाण करायचा आणि अशा घटना इन्स्टाग्रामवर थेट प्रक्षेपितही करायचा. यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता’, अशी माहिती दिली आहे.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !